कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत.देशात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे ज्यांची लग्ने ठरलेले होती.त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच टाळेबंदी कधी उठेल,मंगल कार्यालय मिळेल का नाही हे देखील प्रश्न आहेत.त्यावर दत्तवाडीतील एका कुटुंबाने घरातच विवाह सोहळा केला.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा फटका विवाह सोहळ्यावर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
देशात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे विवाह सोहळा करणे कठीण वाटत असल्यामुळे दत्तवाडीमधील सं.नं ९९९ अनंतकृपा सोसायटीमध्ये राहणारे उभे यांचा सुपुञ व मोकाटे यांची कन्या यांचा विवाह सोहळा सुरक्षित अंतर व नियमांचे पालन करुन संपन्न केला.सदर लग्न समारंभास दोन्हीकडील ५-५नातेवाईक उपस्थित होते.
या प्रसंगी विशेष पोलिस अधिकारी गणेश केरबा ठाकर यांनी वधु-वरास मास्क व सँनिटायझर देऊन शुभेच्छा दिल्या.